Saturday, March 15, 2025
Homeमुंबईअबब....४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले...
spot_img

अबब….४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले काय?- अजित पवारांचा खोचक टोला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- ‘वर्षा बंगल्याचे ४ महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करणे ही नवलाची बाब असून मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो.आमचे सहकारी मुख्यमंत्री होते.परंतु ४ महिन्यातील बील एवढे कसे? चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते काय? काही कळायला मार्ग नाही.करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे फडणवीस सरकार वैयक्तिक रित्या करीत आहेत.”असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर खोचक टोला व टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले,गेल्या ८ महिन्यात ५० कोटी राज्य सरकारने जाहीरातीवर  खर्च केला.मुंबई  महानगर पालिका कडून माहीती घेतली तर १७ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केला गेला आहे.एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परंतु,पानभर जाहीराती देवून उधळपट्टी होत आहे.सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे.त्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली.  बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना ते बोलत होते.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!