Friday, April 17, 2026
Homeमुंबईअबब....४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले...

अबब….४महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये..- चहा मध्ये सोन्याचे पाणी घातले काय?- अजित पवारांचा खोचक टोला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- ‘वर्षा बंगल्याचे ४ महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करणे ही नवलाची बाब असून मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो.आमचे सहकारी मुख्यमंत्री होते.परंतु ४ महिन्यातील बील एवढे कसे? चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते काय? काही कळायला मार्ग नाही.करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे फडणवीस सरकार वैयक्तिक रित्या करीत आहेत.”असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर खोचक टोला व टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले,गेल्या ८ महिन्यात ५० कोटी राज्य सरकारने जाहीरातीवर  खर्च केला.मुंबई  महानगर पालिका कडून माहीती घेतली तर १७ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केला गेला आहे.एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परंतु,पानभर जाहीराती देवून उधळपट्टी होत आहे.सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे.त्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली.  बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना ते बोलत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!