Thursday, August 13, 2026
Homeमध्य प्रदेशअजबच......पण गजबच....आरोग्य विभागाने तब्बल ८० हजारांची माहिती दिली फुकट....- कागदपत्राने संपूर्ण कारच...

अजबच……पण गजबच….आरोग्य विभागाने तब्बल ८० हजारांची माहिती दिली फुकट….- कागदपत्राने संपूर्ण कारच गेली भरून……- ३० दिवसात माहिती न देणे पडले महागात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मध्य प्रदेश(इंदूर) :- आपण नेहमीच बघत असतो की,माहिती अधिकारात मागितलेली माहिती वेळेवर म्हणजेच ३० दिवसात दिली जात नाही.३० दिवसात माहिती दिली नाही तर अशी माहिती अपील कर्त्याला फुकटात देणे बंधनकारक आहे.मात्र हल्ली सगळीकडेच टोलवा-टोलवीचे प्रकार दिसून येत येतात.अशातच अजबच……पण गजबच…. असा प्रकार मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात माहिती अधिकारा अंतर्गत उघडकीस आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते धर्मेंद्र शुक्ला यांनी कोरोना काळात इंदूर जिल्हा प्रशासाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांची माहिती मागविली होती.त्यानुसार त्यांनी व्हेंटिलेटर्स,मास्क,औषध आणि आरोग्याशी संबंधित अन्य वस्तू यांच्या तपशिलाची माहिती मागविली.आरोग्य विभागाने शुक्ला यांना माहिती घेण्यास बोलावले असता संपूर्ण कागदपत्रे ४० हजाराच्या आसपास होते.कागदपत्रे नेण्यासाठी शुक्ला यांनी चक्क सफारी कारच घेऊन गेले.कागद पत्रांनी संपूर्ण कार भरून गेली.शुक्ला यांनी आरोग्य विभागास माहिती मागितली.मात्र त्यांना विहित मुदतीत माहिती मिळाली नाही.त्यानुसार त्यांनी ३२ व्या दिवशी अपील केले.त्यानुसार आदेश काढण्यात आला व संपूर्ण माहिती १५ दिवसात फुकटात मिळाली.४० हजार कागद पत्रांचे २ रुपये प्रति प्रमाणे ८० हजार रुपयांना शासनास चुना लागला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!