उद्रेक न्युज वृत्त
मध्य प्रदेश(इंदूर) :- आपण नेहमीच बघत असतो की,माहिती अधिकारात मागितलेली माहिती वेळेवर म्हणजेच ३० दिवसात दिली जात नाही.३० दिवसात माहिती दिली नाही तर अशी माहिती अपील कर्त्याला फुकटात देणे बंधनकारक आहे.मात्र हल्ली सगळीकडेच टोलवा-टोलवीचे प्रकार दिसून येत येतात.अशातच अजबच……पण गजबच…. असा प्रकार मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात माहिती अधिकारा अंतर्गत उघडकीस आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते धर्मेंद्र शुक्ला यांनी कोरोना काळात इंदूर जिल्हा प्रशासाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांची माहिती मागविली होती.त्यानुसार त्यांनी व्हेंटिलेटर्स,मास्क,औषध आणि आरोग्याशी संबंधित अन्य वस्तू यांच्या तपशिलाची माहिती मागविली.आरोग्य विभागाने शुक्ला यांना माहिती घेण्यास बोलावले असता संपूर्ण कागदपत्रे ४० हजाराच्या आसपास होते.कागदपत्रे नेण्यासाठी शुक्ला यांनी चक्क सफारी कारच घेऊन गेले.कागद पत्रांनी संपूर्ण कार भरून गेली.शुक्ला यांनी आरोग्य विभागास माहिती मागितली.मात्र त्यांना विहित मुदतीत माहिती मिळाली नाही.त्यानुसार त्यांनी ३२ व्या दिवशी अपील केले.त्यानुसार आदेश काढण्यात आला व संपूर्ण माहिती १५ दिवसात फुकटात मिळाली.४० हजार कागद पत्रांचे २ रुपये प्रति प्रमाणे ८० हजार रुपयांना शासनास चुना लागला.