- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील कंत्राटदारांनी कामे पूर्ण केल्यानंतरही थकित बिले काढली जात नसल्याची सर्वत्र ओरड सुरू असतांनाच येत्या ८ डिसेंबर २०२५ रोजी उपराजधानीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ९३.९४ कोटींच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केल्या आहेत.पण,अगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेकेदारांचे तब्बल १५० कोटी रुपयांचे देयक प्रलंबित आहेत.गेल्या वर्षभरापासून ठेकेदार ही थकबाकी मिळवण्यासाठी आंदोलने करीत आहेत.परंतु,त्यांना केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने नागपुरातील ठेकेदारांनी एकजूट दाखवत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.यामुळे रविभवन,आमदार निवास,हैदराबाद हाऊस आणि देवगिरी येथील सुरू असलेली कामे थांबवण्यात आली असून आंदोलनाचा थेट परिणाम हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर होणार आहे.त्यातच,प्रत्यक्षात देयकांचा भरणा होईपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचे ठेकेदारांनी स्पष्ट केल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत.
एकीकडे ठेकेदारांचे आंदोलन तर दुसरीकडे अधिवेशनाचे एक तरी सत्र नागपुरात घेणे नागपूर करारानुसार बंधनकारक आहे.हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही तर नागपूर कराराचा भंग होण्याची शक्यता आहे. अश्यातच सरकार हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेऊ शकतो.कारण येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकांचे कारण यासाठी पुरेसे आहे.ठेकेदारांची देयके मिळाली तर अधिवेशन नागपुरात अन्यथा नागपूर की मुंबई?असा पेच सध्या सरकारपुढे निर्माण झाला आहे.
- Advertisement -

