- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी थकीत असल्याने मजुरांनी पोट कशाने भरावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे निर्दयी सरकारने मजुरांची मजुरी तात्काळ अदा करावी, अन्यथा जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिला होता.अशातच आता रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी नुकतीच चर्चा झालेली असून त्यातील अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झालेले असल्याने सदरचा निधी हा प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात येणार आहे.त्यामुळे राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यातील थकीत मजुरी लवकरच मजुरांच्या खात्यात जमा होणार आहे.योजना राबवत असतांना कामाविषयी तक्रारी होत असतात,परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून न देणे हे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर व शेतकऱ्यांना रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून दिली पाहिजेत,असेही मंत्री गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
- Advertisement -