Thursday, April 16, 2026
Homeजळगांवहृदयद्रावक घटना; तारेतील वीज प्रवाहामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

हृदयद्रावक घटना; तारेतील वीज प्रवाहामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावामध्ये शेतातील तारेच्या कुंपणाला सोडलेल्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये विकास रामलाल पावरा वय ३५ वर्षे,पत्नी सुमन विकास पावरा वय ३० वर्षे,दोन लहान मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.तर दीड वर्षाची चिमुकली दुर्गा विकास पावरा ही थोडक्यात बचावली आहे.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
एरंडोल तालुक्याच्या वरखेडी येथील एका शेतकऱ्याने शेतातील पिके वन्य प्राण्यांच्या तावडीतून सुटावे, यासाठी शेताभोवती लोखंडी तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता.अश्यातच शेतावर जाणाऱ्या पावरा कुटुंबीयांना विद्युत प्रवाहाची कल्पना नव्हती.आज बुधवारी सकाळच्या सुमारास पावरा कुटुंब काही कामानिमित्त शेतावर जाण्यासाठी निघाले असता वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याबरोबर त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि क्षणातच पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच गावात मोठी खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पोलिसांनी शेतमालकाला ताब्यात घेतले असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.पोलिसांकडून घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!