Tuesday, July 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. - काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक...

शहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. – काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक ओलावा नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवसेंदिवस उष्णतेत भर पडत आहे. उष्णतेत वाढ कां होतेय याचा कधी कुणी विचार केला काय? पूर्वी “झाडे लावा झाडे जगवा” असे म्हटले जायचे, पण आता “झाडे तोडा अन् फॅशनेबल राहा” अशी स्थिती निर्माण झाली आहे.घर बांधकामापासून ते रस्ते बांधकाम व विविध बांधकामांनी वृक्षांचा नायनाट करणे सुरू आहे. त्यातच,शहरी भागातील डांबरापासून बनलेले काळे रस्ते आणि खुली पार्किंगची स्थळे सूर्याची उष्णता वेगाने शोषून घेतात.गडद रंगाची छते दिवसभर सौर ऊर्जा शोषून घेतात आणि ती आतच रोखून ठेवतात.
सिमेंट-काँक्रिटच्या उंच-उंच इमारती गरम हवेचा प्रवाह रोखतात,ज्यामुळे रात्रीही उष्ण राहतात.कारखाने,गाड्या, एसीमधून सतत निघणारी कृत्रिम उष्णता वातावरणाला आणखी तापवते.हल्ली ग्रामीण भागातही हीच अवस्था दिसून येत आहे.पूर्वी रस्ते मूळ जमिनीची धुळीने माखलेली असायची,मात्र आता गावातील रस्त्यांना सिमेंट काँक्रिटचा जोड देण्यात येऊ लागला आहे.काँक्रिट आणि सिमेंटमुळे पाणी जमिनीच्या आत जाऊ शकत नाही, ज्यामुळे पृष्ठभागाचा नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.यामुळे
कोरडेपणा येऊन उष्णता वाढवतो.रात्री गारवा न मिळाल्याने शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित होत नाही.वृद्ध व हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका जास्त असतो.रात्रीच्या उष्णतेमुळे वनस्पती आपली ऊर्जा साठवण्याऐवजी ‘श्वसनात’ खर्च करतात.त्यामुळे पिकांचे दाणे लहान राहतात आणि उत्पादनात घट होते.पारा ३० अंशांच्या वर राहिल्याने गाढ झोप लागत नाही,ज्यामुळे थकवा आणि चिडचिडेपणा वाढतो.थंड करणारी उपकरणे चोवीस तास सुरू राहिल्याने विजेची मागणी सर्वोच्च स्तरावर राहते.ट्रान्सफॉर्मर थंड होऊ शकत नाहीत.ग्रीड फेल होण्याचा धोका वाढतो आहे.पुढील काळात उष्णतेचे काही खरे नाही.सध्या स्थितीत उष्माघाताचा आठ राज्यांना फटका बसू लागला आहे.यात महाराष्ट्र राज्यातील विशेषतः विदर्भ व पूर्व भाग,उत्तर प्रदेशातील मध्य व पश्चिम भाग,मध्य प्रदेशातील पूर्व आणि मध्य भाग,राजस्थानातील पूर्व भाग,ओडिशातील पश्चिम व अंतर्गत भाग,झारखंड राज्यातील पश्चिम भाग, तेलंगणातील जवळपास संपूर्ण राज्य तर आंध्रातील उत्तर किनारपट्टी व अंतर्गत भाग तीव्र उष्णेतेने होरपळला जातो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!