Friday, May 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. - काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक...

शहरांसह ग्रामीण भागही उष्णतेच्या विळख्यात.. – काळे रस्ते अन् सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांनी नैसर्गिक ओलावा नष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवसेंदिवस उष्णतेत भर पडत आहे. उष्णतेत वाढ कां होतेय याचा कधी कुणी विचार केला काय? पूर्वी “झाडे लावा झाडे जगवा” असे म्हटले जायचे, पण आता “झाडे तोडा अन् फॅशनेबल राहा” अशी स्थिती निर्माण झाली आहे.घर बांधकामापासून ते रस्ते बांधकाम व विविध बांधकामांनी वृक्षांचा नायनाट करणे सुरू आहे. त्यातच,शहरी भागातील डांबरापासून बनलेले काळे रस्ते आणि खुली पार्किंगची स्थळे सूर्याची उष्णता वेगाने शोषून घेतात.गडद रंगाची छते दिवसभर सौर ऊर्जा शोषून घेतात आणि ती आतच रोखून ठेवतात.
सिमेंट-काँक्रिटच्या उंच-उंच इमारती गरम हवेचा प्रवाह रोखतात,ज्यामुळे रात्रीही उष्ण राहतात.कारखाने,गाड्या, एसीमधून सतत निघणारी कृत्रिम उष्णता वातावरणाला आणखी तापवते.हल्ली ग्रामीण भागातही हीच अवस्था दिसून येत आहे.पूर्वी रस्ते मूळ जमिनीची धुळीने माखलेली असायची,मात्र आता गावातील रस्त्यांना सिमेंट काँक्रिटचा जोड देण्यात येऊ लागला आहे.काँक्रिट आणि सिमेंटमुळे पाणी जमिनीच्या आत जाऊ शकत नाही, ज्यामुळे पृष्ठभागाचा नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.यामुळे
कोरडेपणा येऊन उष्णता वाढवतो.रात्री गारवा न मिळाल्याने शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित होत नाही.वृद्ध व हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका जास्त असतो.रात्रीच्या उष्णतेमुळे वनस्पती आपली ऊर्जा साठवण्याऐवजी ‘श्वसनात’ खर्च करतात.त्यामुळे पिकांचे दाणे लहान राहतात आणि उत्पादनात घट होते.पारा ३० अंशांच्या वर राहिल्याने गाढ झोप लागत नाही,ज्यामुळे थकवा आणि चिडचिडेपणा वाढतो.थंड करणारी उपकरणे चोवीस तास सुरू राहिल्याने विजेची मागणी सर्वोच्च स्तरावर राहते.ट्रान्सफॉर्मर थंड होऊ शकत नाहीत.ग्रीड फेल होण्याचा धोका वाढतो आहे.पुढील काळात उष्णतेचे काही खरे नाही.सध्या स्थितीत उष्माघाताचा आठ राज्यांना फटका बसू लागला आहे.यात महाराष्ट्र राज्यातील विशेषतः विदर्भ व पूर्व भाग,उत्तर प्रदेशातील मध्य व पश्चिम भाग,मध्य प्रदेशातील पूर्व आणि मध्य भाग,राजस्थानातील पूर्व भाग,ओडिशातील पश्चिम व अंतर्गत भाग,झारखंड राज्यातील पश्चिम भाग, तेलंगणातील जवळपास संपूर्ण राज्य तर आंध्रातील उत्तर किनारपट्टी व अंतर्गत भाग तीव्र उष्णेतेने होरपळला जातो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!