Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील छत्तिसावे सत्र संपन्न - छत्तीसाव्या सत्रात ब्रम्हपुरीचे...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील छत्तिसावे सत्र संपन्न – छत्तीसाव्या सत्रात ब्रम्हपुरीचे भिमानंद मेश्राम विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.
या उपक्रमाचे छत्तिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी भिमानंद एस.मेश्राम यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “पावसाचे राजकारण” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे तसेच कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
भिमानंद एस.मेश्राम हे ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवी,गायक,नाट्य कलावंत व नाटककार आहेत.डॉ.आंबेडकर फेलोशिप अवार्ड, विदर्भ भुषण पुरस्कार,मानव भुषण पुरस्कार,नाट्यश्री पुरस्कारासह अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांचे ‘झाली रमाई महान’ हे नाटक झाडीपट्टीत गाजलेले आहे.अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.त्यांच्या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
छत्तिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पंढरी बनसोडे,जयराम धोंगडे,माधुरी अमृतकर,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,नरेंद्र गुंडेली,विलास टिकले,राजरत्न पेटकर, सुनील चडगुलवार, मुर्लीधर खोटेले,पी.डी.काटकर, सुभाष धाराशिवकर,संगीता ठलाल,वंदना सोरते,वंदना मडावी,सोनाली रायपुरे,डॉ.मंदा पडवेकर, वामनदादा गेडाम,कृष्णा कुंभारे,सुरेश गेडाम,रोहिणी पराडकर, संगीता रामटेके,भिमानंद मेश्राम,तुळशीराम उंदीरवाडे, उकंडराव राऊत,प्रेमिला अलोने,पुरुषोत्तम दहिकर, रेखा दिक्षित,सुरज गोरंतवार,डॉ.मंदाकिनी चरडे,गणेश रामदास निकम,मिलींद बी.खोब्रागडे,वसंत चापले,अजय राऊत, सुजाता अवचट,केवळराम बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!