Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार १२ तास वीज पुरवठा - उद्योग,ऊर्जा व कामगार...

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार १२ तास वीज पुरवठा – उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने दिले निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील कृषी पंप धारक शेतकरी बांधवांना केवळ ८ तास विद्युत पुरवठा केला जात असल्याने विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवून रस्ता रोको आंदोलन,चक्का जाम आंदोलन, कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांना घेराव घालून आंदोलन व इतर आंदोलने करून विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीला वेठीस धरून किमान १२ तास शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात यावा; अशी मागणी यापूर्वीही व हल्ली करण्यात येत आहे.

विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, महावितरणने ३ मार्च २०२३ रोजी उद्योग,ऊर्जा व कामगार विभागास पत्रव्यवहार करून २४ तास वीज पुरवठ्याची मागणी केली होती.त्यानुसार उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने काल १५ मार्च २०२३ रोजी उप सचिव यांच्या सहिनिशी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,महावितरण कंपनी मर्या.प्रकाशगड,वांद्रे (पूर्व),मुंबई -५१ यांना निर्देश देऊन आरमोरी,जिल्हा गडचिरोली मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामधील कृषीपंपाना दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.

उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने दिलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की,गडचिरोली जिल्ह्यामध्ये कृषीपंपांना ही कार्यवाही सुरू केल्यापासून पुढील दोन महिने दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा देण्याबाबत संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देवून त्याची अंमलबजावणी सुरु करावी व या संबंधी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास सादर करावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!