Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार १२ तास वीज पुरवठा - उद्योग,ऊर्जा व कामगार...

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार १२ तास वीज पुरवठा – उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने दिले निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील कृषी पंप धारक शेतकरी बांधवांना केवळ ८ तास विद्युत पुरवठा केला जात असल्याने विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवून रस्ता रोको आंदोलन,चक्का जाम आंदोलन, कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांना घेराव घालून आंदोलन व इतर आंदोलने करून विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीला वेठीस धरून किमान १२ तास शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात यावा; अशी मागणी यापूर्वीही व हल्ली करण्यात येत आहे.

विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, महावितरणने ३ मार्च २०२३ रोजी उद्योग,ऊर्जा व कामगार विभागास पत्रव्यवहार करून २४ तास वीज पुरवठ्याची मागणी केली होती.त्यानुसार उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने काल १५ मार्च २०२३ रोजी उप सचिव यांच्या सहिनिशी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,महावितरण कंपनी मर्या.प्रकाशगड,वांद्रे (पूर्व),मुंबई -५१ यांना निर्देश देऊन आरमोरी,जिल्हा गडचिरोली मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामधील कृषीपंपाना दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.

उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने दिलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की,गडचिरोली जिल्ह्यामध्ये कृषीपंपांना ही कार्यवाही सुरू केल्यापासून पुढील दोन महिने दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा देण्याबाबत संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देवून त्याची अंमलबजावणी सुरु करावी व या संबंधी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास सादर करावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!