Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीआपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढून लोकन्यायालयाचा लाभ घेण्याचे आवाहन..

आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढून लोकन्यायालयाचा लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने येत्या,शनिवार १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली व अहेरी तसेच तालुका न्यायालय अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज, धानोरा,कुरखेडा आणि सिरोंचा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असून न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे,दिवाणी दावे तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या संमतीने आपसी तडजोडीद्वारे निकाली काढण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपातील तडजोडीस पात्र प्रकरणे,प्ली बार्गेनिंग प्रकरणे,१३८ एन.आय.ॲक्ट अंतर्गत प्रकरणे,भूसंपादन प्रकरणे,कौटुंबिक वाद,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बँकांशी संबंधित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वादांमध्ये टेलिफोन व मोबाईल कंपन्यांशी संबंधित वाद,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे,पतसंस्थांशी संबंधित वाद,नगर परिषद व ग्रामपंचायत कर आकारणी प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे यांचा समावेश असणार आहे.
लोकअदालतीत प्रकरणे तडजोडीसाठी ठेवतांना कोणत्याही प्रकारची न्यायालयीन फी भरावी लागत नाही.तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपील करता येत नाही.लोकअदालतीत झालेला निर्णय न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलात आणता येतो.यामध्ये साक्ष-पुरावा,उलटतपासणी व दीर्घ युक्तीवादाची प्रक्रिया टाळली जात असल्याने प्रकरणांचा जलद व सोपा निपटारा होतो.शिवाय लोकअदालतीत निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार भरलेली कोर्ट फी परत मिळण्याची तरतूद आहे.तरी येत्या,१४ मार्च २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकार, अधिवक्ता व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढून लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती अंकुश खानोरकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!