Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय? - 'तो' कोणत्या निकषांवर दिला...

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय? – ‘तो’ कोणत्या निकषांवर दिला जातो? भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी काय दिले जाते…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय काल,३ ऑक्टोंबरला केंद्राने घेतल्याने मराठी मायबोली बद्दल अनेक दिग्गज तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला.केंद्राने मराठीसह बंगाली,पाली,आसामी,प्राकृत या ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय? ‘तो’ कोणत्या निकषांवर दिला जातो?
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटणे. भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.भाषा भवन उभारणे,भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे,ग्रंथलये उभारणे,देशभरातील विद्यापीठे किंवा इतर संस्थांमार्फत भाषेचा प्रसार देखील यातून करता येतो.विशेष म्हणजे,भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्यासाठी व्यवस्था केली जाणार.प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.अभिजात दर्जा मिळाल्याने या भाषेतील विद्वान व्यक्तींना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो.अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना देखील करता येते.
आता भाषेला दर्जा तर मिळाला आहे; मात्र एखाद्या भाषेला अभिजात दर्जा कोणत्या निकषांवर दिला जातो? तर अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी लागते.या भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी लागते.महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य मूळ भाषेतीलच असावे,दुसऱ्या भाषांमधून अनुवाद केलेले नसावे.तसेच भाषेचा प्रवास हा अखंडित असावा. प्राचीन भाषा आणि सध्या वापरतो त्या भाषेतील नाते ठळक दिसावेत.या काही अटी आहेत; याच निकषांवर भाषेला अभिजात दर्जा दिला जातो.
भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्यसरकारकडून हा प्रस्ताव पाठवल्यानंतर साहित्य अकादमीकडून भाषेच्या पुराव्यांची रीतसर तपासणी केली जाते, तथ्यांची पडताळणी केली जाते,काही त्रुटी आहेत का? ते बघितले जाते.या सगळ्या प्रक्रियेतून भाषा पास झाली की,मग केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडे भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शिफारस केली जाते व मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मांडला जातो; अशी संपूर्ण  प्रक्रिया भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी करण्यात येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!