Friday, May 1, 2026
Homeनागपूरआता १ जुलै पासून होणार तीन कायद्यात बदल…-खून प्रकरणातील ३०२ ऐवजी १०३(१)…

आता १ जुलै पासून होणार तीन कायद्यात बदल…-खून प्रकरणातील ३०२ ऐवजी १०३(१)…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- खून प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल होतो; हे सामान्य नागरिकांनाही माहिती आहे.मात्र आता नवीन कायद्यांतर्गत भादंविच्या कलमांमध्ये बदल होणार आहे. उदाहरणार्थ,खून प्रकरणात आता भादंविच्या कलम ३०२ ऐवजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. सामान्य भाषेत नागरिक लुटपाटची घटना घडली की, ३९२ झाला असे म्हणता.मात्र आता बीएनएसमध्ये ही कलम ३०९ असेल.

तीन नवीन फौजदारी कायदे- भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, केंद्र सरकारने २५ डिसेंबर २०२३ रोजी अधिसूचित केले होते.आता १ जुलैपासून या ३ नवीन कायद्या अंतर्गतच गुन्हे नोंदविण्यात येतील.हे कायदे भारतीय दंड संहिता,दंड प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याची जागा घेतील.आता हे तिन्ही नवीन कायदे स्वीकारणे सहज शक्य होणार नाही.कारण न्यायाधीश व वकिलांसोबतच न्यायालयीन कर्मचारी आणि पोलिस विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हे कलम लक्षात ठेवावे लागेल.त्यानुसारच कोर्टात बाजू मांडावी लागेल. 

सर्व विधी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण 👇

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे (डीएलएसए) सचिव- न्यायाधीश सचिन एस.पाटील यांनी सांगितले की, १ जुलैपासून नवीन कायद्याच्या कलमांनुसार कामाला सुरुवात होईल.तिन्ही नवीन कायद्यांचे उद्दिष्ट न्याय प्रदान करणे आहे.हे फौजदारी प्रकरणात न्याय देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत आणि दस्तऐवजांची व्याख्या लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. याची माहिती सर्व विधी अधिकाऱ्यांना असली पाहिजे.डीएलएसएकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.न्यायाधीश,वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. यानंतर नागरिकांना नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.यासाठी ई-कोर्सचाही वापर केला जाऊ शकतो. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!