Saturday, May 2, 2026
Homeकोल्हापूरवडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेच लावून दिला आईचा दुसरा लग्न...!- विधवा प्रथा बंद करून...

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेच लावून दिला आईचा दुसरा लग्न…!- विधवा प्रथा बंद करून पुरोगामी चळवळीची नवी दिशा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्यूज वृत्त 

कोल्हापूर :-पतीच्या निधनाने आई सतत दुःखी राहायची.समाजात वेगळी वागणूक मिळू नये म्हणून आईचे दुसरे लग्न लावण्याचा धाडसी निर्णय मुलगा युवराजने घेतला.शेतकरी असलेल्या पाहुण्यातीलच व्यक्ती मारुती व्हटकर हे युवराजला योग्य वाटल्याने त्याने पुढची बोलणी सुरू ठेवली. आईला याबाबतची माहिती दिली.मात्र आईने यास स्पष्ट नकार दिला. काही दिवस तिची समजूत काढण्यात गेली.मुलाच्या हट्टापुढे शेवटी आई लग्नास तयार झाली.त्यापूर्वी तिने पाहुण्यांसह गल्लीतील काही महिलांच्या कानावर ही गोष्ट घातली.मुलगा पाठीशी असल्याने सर्वांनी तिला पाठिंबा दिला.१२ जानेवारीला पै-पाहुणे,शेजाऱ्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.युवराजची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या निर्णयाने कोल्हापूरने पुरोगामी चळवळीत आणखी एक नवे पाऊल टाकले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) गावाने विधवा प्रथा बंद करून राज्यालाच नव्हे तर देशाला पुरोगामी चळवळीची दिशा दिली. याचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक गावांसह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेशमधील गावांनी केले.याच चळवळीत पुढचे पाऊल युवराज शेले या युवकाने टाकले आहे. युवराजचे आई- वडील नारायण व रत्ना यांचा २५ वर्षांपूर्वी विवाह झाला. वडील सेंट्रिग काम करायचे. आई घरकाम करत त्यांना मदत करायची. त्यांचा संसार सुखाने सुरू होता. युवराजचे त्यावेळी शिक्षण सुरू होते.काही वर्षांपूर्वी कामावरून घरी परतताना नारायण यांचा अपघातात मृत्यू झाला होता. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!