उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे.यंदा २४ ऑक्टोबरला म्हणजेच आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले.हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो.या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता.या दिवशी रावण दहनासह देवी दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते.या परंपरेनुसार शहरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्यात येणार. मंदिरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा
दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना,आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की,दारात त्यांची पत्नी किवा बहीण त्यांना ओवाळीत असे.यानुसार दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची परंपरा सुरू झाली.

