Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीअसत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे 'दसरा'….-आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची...

असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणजे ‘दसरा’….-आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आजही कायम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे.यंदा २४ ऑक्टोबरला म्हणजेच आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले.हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो.या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता.या दिवशी रावण दहनासह देवी दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते.या परंपरेनुसार शहरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्यात येणार. मंदिरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे.

आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा

दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना,आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की,दारात त्यांची पत्नी किवा बहीण त्यांना ओवाळीत असे.यानुसार दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची परंपरा सुरू झाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!