Tuesday, May 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी; -दोन ट्रेन धडकल्या एकमेकांवर; १५ ठार तर १०० जखमी…

मोठी बातमी; -दोन ट्रेन धडकल्या एकमेकांवर; १५ ठार तर १०० जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- बांगलादेशमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १५ जण ठार झाले असून,१०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत.मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.राजधानी ढाकापासून ८० किमी दूर भैरब येथे प्रवासी ट्रेनने एका मालगाडीला धडक दिली.दोन्ही ट्रेन वेगवेगळ्या दिशेने धावत होत्या.धडकेनंतर दोन्ही ट्रेन रुळावरुन खाली घसरल्या.दुर्घटनेनंतर प्रवाशांची एकच आरडाओरड सुरु झाली होती. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजूल इस्लाम यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.सरकारी अधिकाऱ्याने एफपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार,आम्हाला १५ मृतदेह सापडले आहेत. अनेकजण जखमी असून आकडा वाढू शकतो. बचावकार्य सुरु असून यादरम्यान खाली दबलेले आणखी मृतदेह सापडू शकतात.यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने ही दुर्घटना झाल्याचे दिसून येत आहे.बांगलादेशात ट्रेन अपघात होणं ही आता सामान्य बाब झाली आहे. खराब सिग्नल, बेजबाबदारपणा, जुने ट्रॅक आणि खराब पायाभूत सुविधा यामुळे या दुर्घटना होत असतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!