Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीघरकुल बांधकामास आधार देणारेच झाले निराधार....!'नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी'….कंत्राटी...

घरकुल बांधकामास आधार देणारेच झाले निराधार….!’नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी’….कंत्राटी अभियंत्यांचे ८ महिन्यांपासून रखडले मानधन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- ग्रामीण भागातील गोर गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुल बांधकामाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांचे गेली ८ महिन्यांपासून मानधन रखडले असल्याने घरकुल बांधकामास आधार देणारेच निराधार झाले आहेत.अशातच ‘करीत रहा काम; तुम्हाला मिळणार नाही दाम’ असे हल्ली ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या बाबतीत दिसून येत असल्याने घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या अभियंत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंते(इंजिनिअर) घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा समजला जातो आहे.घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होण्यापासून तर बांधकाम पूर्ण होण्यास्तवची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.जसे,कितीतरी किलोमीटर अंतरावरील घरकुल लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देणे,बांधकामाची आखणी करून देणे, टप्पे निहाय घरकुल बांधकामाचे फोटो काढून नेणे, लाभार्थ्यांना हफ्ते वितरीत करणे,वेळोवेळी बांधकामा संबंधी तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे व इतर अशी अनेक कामे अभियंते करीत असतात.मात्र गेली ८ महिन्यांपासून ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांचे मानधन मिळाले नसल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या घरा पर्यंत जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच वेळेवर मानधन मिळत नसल्याने अभियंत्यांवर उपासमारीची पाळी बरोबरच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.’नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी’अशी अवस्था हल्ली ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांची झाली आहे.

मिळणारे मानधन अत्यल्प असूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कुटुंब सांभाळावे कसे?कामे करायची कशी?असा विचार अभियंत्यांच्या मनात घर करून सोडत आहे.कित्येकदा संप पुकारून आंदोलने करण्यात आली.मात्र शासनास केव्हा जाग येणार? हे अनेकांना कळेनासे झाले आहे.एकीकडे कामे करवून घेणे व कंत्राटी कर्मचारी वर्गांचे शोषण करणे असे दिसून येत आहे.नियमित कर्मचारी वर्गांचे वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांना कसे वाटणार? यासाठी शासनाने मानधनात वाढ करून गेली ८ महिन्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे; तसेच वेळेवर मानधन देण्यात यावे; अशी मागणी ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

ताडोबात रेस्क्यू सेंटर बांधकामाच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वर्चस्व असलेल्या छोटा मटकाची मागील वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला 'ब्रम्हा' वाघाशी झुंज झाली होती.या संघर्षात...

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!