Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीअखेर आरमोरीच्या वनखी येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू..

अखेर आरमोरीच्या वनखी येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत चामोर्शी माल अंतर्गत मौजा वनखी (वासाळा)येथील नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून,गावातील नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेतील उर्वरित किरकोळ कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
वनखी येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.या योजनेमध्ये पुरवठा विहीर,स्वच्छता कामे,उर्ध्वनलिका,जलकुंभ,वितरण व्यवस्था व इतर पूरक कामांचा समावेश आहे.योजनेचे बहुतांश कामे पूर्ण झाले असून १६ मे २०२५ पासून चाचणी तत्वावर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र,९ जानेवारी २०२६ रोजी व्हॉल्व्ह लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता.त्यानंतर संबंधित व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली.दरम्यान,वीज देयक थकबाकीमुळे योजनेचा मीटर बंद करण्यात आल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात अडचण निर्माण झाली होती. या संदर्भात ग्रामपंचायत,कंत्राटदार,विद्युत विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वेळोवेळी चर्चा करण्यात आली.२८ एप्रिल २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात कंत्राटदाराची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वीज देयकाची थकबाकी तात्काळ भरून योजना सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार,५ मे २०२६ रोजी विद्युत विभागामार्फत देयकाची तृटीपूर्तता करून वीज देयक भरण्यात आले. योजनेचा मीटर थ्री फेजचा असतांनाही सुरुवातीला सिंगल फेज पुरवठा सुरू करण्यात आला होता.त्यानंतर ६ मे २०२६ रोजी पुन्हा लाईनमनमार्फत थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला.पुढे ७ मे २०२६ रोजी पाण्याची टाकी स्वच्छ करून गावात नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.वनखी येथील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी योजनेतील उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!