- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण
योजनेसाठी ई-केवायसी करतांना अनेक लाडक्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते,त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ हा बंद झाला होता.ज्या महिलांनी ई-केवायसी करतांना चुका केल्या होत्या,अशांसाठी शासनाकडून ३१ मार्च २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली होती.मात्र,राज्यातील जास्तीत-जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि तांत्रिक कारणांमुळे कोणीही वंचित राहू नये,यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार १ एप्रिल २०२६ रोजी योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा केली आहे.त्यानुसार,सदरची मुदतवाढ ही चालू महिन्याच्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याने महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी केवळ सात दिवस उरले आहेत.यानंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुदतवाढ देत असतांनाच स्पष्ट केले होते. त्यामुळे,ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी दुरुस्ती केलेली नसेल,अश्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी; अन्यथा महिण्याकाठी मिळणारे दीड हजार रुपये कायमचे बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

