Tuesday, July 14, 2026
Homeनागपूरसोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी 'आम्ही भारताचे लोक' यांच्यावतीने उद्याला एकदिवसीय धरणे आंदोलन..

सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी ‘आम्ही भारताचे लोक’ यांच्यावतीने उद्याला एकदिवसीय धरणे आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-देशात काही खरं नाही.चांगल्या माणसाची किंमतच राहिलेली नाही वाटते.ज्या माणसाने आपल्या ज्ञानाच्या जोरावर देशातच नव्हे तर जगभर ख्याती मिळवून मोठ-मोठे पुरस्कार,नवनवीन संशोधन करून देशाचे नाव कानाकोपऱ्यात अजरामर केले,अश्या प्रसिद्ध पर्यावरणवादी,शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत(NSA) अटक करून राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अश्यातच आता सोनम वांगचुक यांची तातडीने निर्दोष सुटका करण्याच्या मागणीसाठी उद्या,मंगळवार ७ ऑक्टोंबर रोजी ‘आम्ही भारताचे लोक’ यांच्यावतीने नागपूरच्या संविधान चौकात दुपारी १२ वाजल्यापासून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.यात सोनम वांगचुक यांची  बिनशर्त सुटका करावी,अटक केलेल्या नागरिकांचीही सुटका करावी,लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये सामील करण्यात यावे या मागणीचा समावेश असणार आहे.
प्रसिद्ध पर्यावरणवादी,शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.त्याचे पडसाद नागपुरातही उमटले असून,काल रविवारी नागपुरातील नागरिकांनी शांतिमार्च काढून वांगचूक यांच्या अटकेचा निषेध केला.सोनम वांगचूक हे राष्ट्रीय हिरो असून,त्यांच्यासह अटक करण्यात आलेल्या लडाखच्या नागरिकांची तातडीने सुटका करा, अशी मागणी केली.वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात नागपुरातील नागरिकांच्या एका गटाने एकत्र येऊन फ्रेंड्स ऑफ लडाख,फ्रेंड्स ऑफ नागपूरची स्थापना केली.या बॅनर अंतर्गत नागपूरकरांनी काल रविवारी शांतिमार्च काढला. सायंकाळी साडेपाच वाजता व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून या मार्चला सुरुवात झाली.संविधान चौकात या मार्चचा समारोप करण्यात आला.आम्ही लडाखच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत.सहाव्या अनुसूचीची त्यांची मागणी ही पर्यावरणीय न्याय,सांस्कृतिक जतन आणि आपल्या संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांची मागणी आहे.सोनम वांगचूक सारख्या शांतताप्रिय आवाजांना अटक करणे अत्यंत चिंताजनक आहे.आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करतो आणि सरकारला संवादात सहभागी होण्याचे आणि लडाखी लोकांच्या न्याय्य आकांक्षा पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!