Tuesday, July 7, 2026
Homeतामिळनाडूसाप पकडणाऱ्यांना 'पद्मश्री' साठी फोन येतो तेव्हा ...


साप पकडणाऱ्यांना ‘पद्मश्री’ साठी फोन येतो तेव्हा …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ऑनलाईन डेस्क उद्रेक न्युज वृत्त

तामिळनाडू :-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला केंद्र सरकारकडून ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा तामिळनाडू मधील साप पकडणाऱ्या दोघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले हे साप पकडणारे दोन्ही अवलिया तामिळनाडू मधील इरुला या आदिवासी जमातीतून येतात.मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल अशी या दोघांची नावे आहेत. जेव्हा पुरस्कार घोषित झाल्याचा फोन या दोघांना आला तेव्हा हे दोघे साप पकडत होते. यांनी फोन उचलला आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तेव्हा या दोघांनी एक मिनिट थांबत दिर्घ श्वास घेतला, एकमेकांकडे पाहिले आणि गालातल्या गालात हसत पुन्हा साप पकडण्याच्या मागे लागले.

आदिवासी जमातीतील इरुला हे लोक तामिळनाडूच्या देनाकनिकोट्टईच्या जवळील जंगल परिसरात राहतात. त्यांना कन्नड भाषा सुद्धा चांगल्यापद्धतीने बोलता येते. हे लोक उंदीर आणि साप पकडण्यात अत्यंत कुशल आणि तरबेज आहेत.

२०१७ मध्ये अमेरिका अजगरांच्या त्रासाने वैतागली होती. अमेरिकेतील जंगलातील बर्मन जातीचे अजगरे पकडण्यासाठी अमेरिकेने थेट मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल या जोडीलाच साद घातली. तेव्हा ही साप पकडणारी जोडी प्रथम प्रकाश झोतात आली होती.अजगर पकडण्यासाठी या दोघांना अमेरिकेने ४४ लाख रुपये दिले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!