- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी भरपाई घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या दोन तलाठ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला.न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.
अनंता श्रीराम माठे व उमेश गजानन बिल्लेवार,अशी आरोपींची नावे आहेत.या प्रकरणात तहसीलदार शीतल सोलाट यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.आरोपींनी १ कोटी ९७ लाख १९ हजार ३३७ रुपयांचा घोटाळा केला आहे.हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.सार्वजनिक निधीत गैरव्यवहार
करण्यात आला आहे.त्यामुळे प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.करिता आरोपींना जामीन दिला जाऊ शकत नाही; असे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.२७ जून २०२३ रोजी राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले.करिता सरकारने त्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तलाठ्यांना नुकसानीचा पंचनामा करून अहवाल द्यायचा होता.या आरोपींनी भरपाईत घोटाळा करण्यासाठी अपात्र शेतकऱ्यांची नावे रेकॉर्डवर टाकली असल्याचा प्रकार उजेडात आला.त्यामुळे प्रकरण चांगलेच गाजले.सरकारच्या वतीने ॲड.हर्षल दुबे व ॲड.के.आर.लुले यांनी कामकाज पाहिले.
- Advertisement -

