उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेचे पैसे तांत्रिक कारणांमुळे नाही,तर ई-केवायसी करतांना झालेल्या चुकांमुळे अनेक पात्र महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रत्येकी दीड हजार रुपये मिळालेले नाहीत.या चुका दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेले पोर्टल अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी करावी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्याने पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी केल्याशिवाय पर्याय नाही; अन्यथा लाभ बंद करण्यात येणार आहे.शासनाने ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती.या मुदतीत राज्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी तर केली,पण त्यात एका प्रश्नाने अनेकांना गोंधळात टाकले होते.तो प्रश्न म्हणजे, १.माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.असा प्रश्न असल्याने अनेकांनी याची माहिती भरतांना चुका केल्या. काहींनी नाही,तर काहींनी होय,असे टिक केले.महत्वाचे म्हणजे,याचे खरे उत्तर होय,असे आहे.ज्यांनी होय केले व ज्यांचे बँकेशी आधार लिंक आहे; अश्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रत्येकी दीड हजार प्रमाणे तीन हजार रुपये जमा झाले आहेत.अश्यातच अर्जातील माहिती आणि बँक खात्याची केवायसी यामध्ये किरकोळ तफावत असल्याने अनेक महिलांना ‘अपात्र’ ठरवण्यात आले आहे.त्यातच, बऱ्याच कालावधीपासून शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी योजनेच्या पोर्टलवर हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक-१८१ देण्यात आला आहे.लाडक्या बहिणींना काही अडचण असल्यास त्यावर संपर्क साधून समस्यांचे निराकरण करू शकतात.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करतांना अनेक चुका.. – टोल फ्री क्रमांकावर करा संपर्क..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

