Monday, August 24, 2026
Homeगडचिरोली“मिशन-२०० उपक्रम" देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी..

“मिशन-२०० उपक्रम” देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना योग्य दिशा व सातत्यपूर्ण मार्गदर्शन देणारा नियोजित ‘मिशन-२००’ हा उपक्रम जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड ठरेल,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी समाज कल्याण विभागामार्फत आयोजित तीन दिवसीय निवासी फाउंडेशन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
समाज कल्याण विभाग गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देशातील तसेच देशाबाहेरील नामांकित विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी करून देण्यासाठी ‘मिशन-२००’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २०० विद्यार्थ्यांना भारतातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(JNU),दिल्ली विद्यापीठ (DU),टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स(TISS), अजीम प्रेमजी विद्यापीठ,शिव नाडर विद्यापीठ,पिरमल विद्यापीठ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(IIT),इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM)तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठांच्या परीक्षांची नियोजित तयारी करून दिली जाणार आहे.या उपक्रमासाठी संकल्प फाऊंडेशन यांच्या माध्यमातून वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार असून,ज्या अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणतः ४ ते ५ लाख रुपये आहे,ते अभ्यासक्रम समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातच पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रमांची निवड,अर्ज भरणे,प्रवेश परीक्षा तयारी ते अंतिम प्रवेश मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विभागाकडून मार्गदर्शित केली जाणार आहे.
कार्यशाळेदरम्यान देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे निवड झालेल्या विशाल मेश्राम,युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम येथे निवड झालेल्या अभय पेंदाम तसेच इटरनल युनिव्हर्सिटी हिमाचल प्रदेश येथे निवड झालेल्या कुमारी चैतन्या गोमसकार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी,संकल्प फाऊंडेशनचे संचालक पंकज नरुले उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!