- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-एटापल्ली तालुक्यातील करपनफुंडी गावातील एका वृद्ध अदिवासी महिलेचा आज,२७ ऑगस्ट रोजी नदीमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बुर्गो रैनू गोटा वय ५५ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.
करपनफुंडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जांभिया आणि बांडे या दोन नद्यांच्या संगमानजीक गोटा दाम्पत्याची शेती आहे.अलीकडेच धानाची रोवणी झाल्याने मागील काही दिवसांपासून बुर्गो व पती रैनू जंगली गोटा वय ६० वर्षे हे दोघेही शेतावर असलेल्या झोपडीत राहत होते.परंतु शनिवारपासून
दोघेही बेपत्ता होते.कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता दोघेही आढळून आले नाही.परंतु आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नदीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली.नातेवाईकांनी जवळ जाऊन बघितले असता कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह बुर्गोचा असल्याचे समजले.मात्र, रैनूचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांची हत्या करण्यात आल्याचा नातेवाईकांचा संशय आहे.घटनास्थळ नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने पोलिस तपासात अडचणी येत आहेत.बुर्गी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ पुरी घटनेचा तपास करीत आहेत.
- Advertisement -

