Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने घातला थैमान...!- संततधार पाऊस,वादळ-वाऱ्याने जनजीवन  विस्कळित....- 'घरी लग्न...

गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने घातला थैमान…!- संततधार पाऊस,वादळ-वाऱ्याने जनजीवन  विस्कळित….- ‘घरी लग्न तर अवकाळी पावसाने घातलाय विघ्न’….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यात दररोज अवकाळी पावसाने थैमान घालत संततधार पडणारा पाऊस, वादळ-वारा,मेघ गर्जना व विजांचे कडकडाटाने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.आज ३० एप्रिल २०२३ रोजी रात्रौ पासूनच अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने अनेक नागरिकांची घरे व झोपड्या वरील छत उडाले असल्याने नागरिकांनी नुकसाभरपाईची मागणी केली आहे.अशातच सर्वसामान्य नागरिक सध्या सुरू असलेला उन्हाळा की पावसाळा अशा संभ्रमात पडले आहेत.

हल्ली काही शेतकरी बांधवांचे धान पीक निसावण्याच्या तयारीत असतांना अवकाळी पडणारे पावसाचे पाणी त्यासाठी घातक ठरू लागले आहे. सोसाट्याच्या वादळ-वाऱ्याने उभे असलेले धान पीक खाली झोपू लागले आहेत.अशातच धो-धो पडणारा पाऊस व वादळ वारा आणखी किती दिवस येणार?असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या स्थितीत लग्न समारंभ सुरू असून ‘घरी लग्न तर अवकाळी पावसाने घातलाय विघ्न’अशी हल्ली परिस्थिती उद्भवली असल्याने विवाह सोहळ्यात अवकाळी पावसामुळे विरजण पडले आहे.धो-धो पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावरून पाणी तसेच नाल्या भरभरून वाहू लागल्या आहेत. लग्न समारंभातील वऱ्हाडी मंडळी पावसामुळे एखाद्या घराचा वा सार्वजनिक ठिकाणचा आडोसा घेतांना दिसून येत आहेत.सकाळचे विवाह दुपारी वा सायंकाळी लागतांना दिसून येत आहेत.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत अवकाळी पाऊस,वादळ वारा व कडकडाटासह मेघ गर्जना होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.त्यानुसार अवकाळी पावसाने थैमान घालत जनजीवन विस्कळित केले आहे.अशातच आणखी किती दिवस अवकाळी पाऊस पडणार आहे; अशी स्थिती हल्ली निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!