- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील रब्बी पिकांची सन २०२५-२६ या वर्षातील हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६५ पैसे इतकी ठरविण्यात आली आहे; अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे असून त्यापैकी १४८ गावे रब्बी पिकाची आहेत.या रब्बी पिकाच्या गावांपैकी ८८ गावांमध्ये पीके नसल्याचे आढळून आले आहे. उर्वरित रब्बी पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव नाही.तर ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या रब्बी पिकाच्या गावांची संख्या ६० आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ६० गावांमध्ये रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सन २०२५-२६ या वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याची रब्बी पिकांची हंगामी पैसेवारी ६५ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे.
- Advertisement -

