Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोली‘आदि कर्मयोगी’ जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न.. - २ लाख ८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत शंभर...

‘आदि कर्मयोगी’ जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न.. – २ लाख ८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत शंभर टक्के लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘आदि कर्मयोगी’ उत्तरदायी शासन कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण गडचिरोली येथे संपन्न झाले.
४ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा,गडचिरोली येथे झालेल्या तीन दिवसीय District Process Lab (DPL) प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अविशांत पंडा,मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रणजीत यादव,कुशल जैन यांनी केले.
धरती आबा अभियानाची सुरुवात २ ऑक्टोंबर २०२४ रोजी हजारीबाग(झारखंड)येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाले.तर महाराष्ट्रात या अभियानाच्या प्रचार-प्रसार उपक्रमाचे उद्घाटन १६ जून २०२५ रोजी  मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते झाले. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३२ जिल्हे,२१४ तालुके व ४ हजार ९७५ गावे निवडण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुके व ४११ गावे या उपक्रमात समाविष्ट असून २ लाख ८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत वैयक्तिक व सामूहिक लाभ शंभर टक्के पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.अभियानांतर्गत केंद्र शासनाने १७ विभागांच्या माध्यमातून २५ योजना राबविण्याचा आराखडा आखला असून,त्यात शिक्षण, आरोग्य,महिला व बालविकास,ग्रामीण विकास, पाणीपुरवठा,पंचायत,वन,कृषी,पशुसंवर्धन,सहकार, सार्वजनिक बांधकाम,विद्युत वितरण व आदिवासी विकास विभाग यांचा समावेश आहे.स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग यात आहे.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मास्टर ट्रेनर्स नितीन पाटील,योगेश वैद्य,रवी आत्राम, विक्रम सटाले,गजानन भांडेकर,प्रवीण पाटील,अखिल श्रीरामवार व माधव मडावी यांनी मोलाची भूमिका बजावली.या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात बहुस्तरीय क्षमता विकास घडवून आणत उत्तरदायी शासन व्यवस्था उभारण्याचा केंद्र शासनाचा उद्देश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!