Thursday, August 27, 2026
Homeनागपूरआता १ जुलै पासून होणार तीन कायद्यात बदल…-खून प्रकरणातील ३०२ ऐवजी १०३(१)…

आता १ जुलै पासून होणार तीन कायद्यात बदल…-खून प्रकरणातील ३०२ ऐवजी १०३(१)…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- खून प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल होतो; हे सामान्य नागरिकांनाही माहिती आहे.मात्र आता नवीन कायद्यांतर्गत भादंविच्या कलमांमध्ये बदल होणार आहे. उदाहरणार्थ,खून प्रकरणात आता भादंविच्या कलम ३०२ ऐवजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. सामान्य भाषेत नागरिक लुटपाटची घटना घडली की, ३९२ झाला असे म्हणता.मात्र आता बीएनएसमध्ये ही कलम ३०९ असेल.

तीन नवीन फौजदारी कायदे- भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, केंद्र सरकारने २५ डिसेंबर २०२३ रोजी अधिसूचित केले होते.आता १ जुलैपासून या ३ नवीन कायद्या अंतर्गतच गुन्हे नोंदविण्यात येतील.हे कायदे भारतीय दंड संहिता,दंड प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याची जागा घेतील.आता हे तिन्ही नवीन कायदे स्वीकारणे सहज शक्य होणार नाही.कारण न्यायाधीश व वकिलांसोबतच न्यायालयीन कर्मचारी आणि पोलिस विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हे कलम लक्षात ठेवावे लागेल.त्यानुसारच कोर्टात बाजू मांडावी लागेल. 

सर्व विधी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण 👇

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे (डीएलएसए) सचिव- न्यायाधीश सचिन एस.पाटील यांनी सांगितले की, १ जुलैपासून नवीन कायद्याच्या कलमांनुसार कामाला सुरुवात होईल.तिन्ही नवीन कायद्यांचे उद्दिष्ट न्याय प्रदान करणे आहे.हे फौजदारी प्रकरणात न्याय देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत आणि दस्तऐवजांची व्याख्या लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. याची माहिती सर्व विधी अधिकाऱ्यांना असली पाहिजे.डीएलएसएकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.न्यायाधीश,वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. यानंतर नागरिकांना नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.यासाठी ई-कोर्सचाही वापर केला जाऊ शकतो. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!