Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीअन् ग्रामपंचायत पदाधिकारीच बनले ठेकेदार…-पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे…

अन् ग्रामपंचायत पदाधिकारीच बनले ठेकेदार…-पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील अनेक गावे समस्याग्रस्त आहेत.परंतु ग्रामपंचायतींचे पदाधिकारी गावातील समस्यांकडे लक्ष देत नसून केवळ ठेकेदारीत व्यस्त असल्याचे विदारक चित्र हल्ली सगळीकडेच दिसून येत आहे.अशातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्याने तालुक्यातील अनेक गावांत शिक्षण,घर, स्वच्छता,पिण्याचे पाणी,रस्ते,नाल्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.

गावचा सर्वांगीण विकास व्हावा; तसेच गावातील समस्या सोडविण्यात याव्या; हे केवळ प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या भरवशावर होऊ शकणार नसल्याने लोकशाही मार्गाने दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक घेऊन गावातील पदाधिकारी यांची ग्रामपंचायत स्तरावर निवड करण्यात येते. पदाधिकारी निवडून आल्यावर काही पदाधिकारी सोडल्यास इतर हुशार पदाधिकारी केवळ ठेकेदारी वा खिसे कसे गरम होणार; याकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात मग्न असतात.

ग्रामपंचायतींचे पदाधिकारी ठेकेदारीत रमले असल्याने बांधकामांवर देखरेखीचा अभाव दिसून येत आहे. त्यातच नियोजनानुसार कामे केली जात नसून पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाची बांधकामे करण्यात येत आहेत.ग्रामपंचायतीचे पदाधिकारीच कंत्राटदार असल्यामुळे ‘हम करे सो कायदा’ अशी गत झाली आहे.बहुतांश गावांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांचे कंत्राट ग्रामपंचायत पदाधिकारी स्वतःच घेऊन; दुसऱ्यांची नावे पुढे करून; ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका बजावतांना दिसून येत आहेत.त्यामुळे अशांवर आळा घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!