Thursday, August 6, 2026
Homeभामरागड२६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली हत्या- भामरागड तालुक्यातील मर्दहूर...

२६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली हत्या- भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली (भामरागड) :- तालुक्यातील मर्दहूर गावातील २६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई- वडील व दोन भावंडांनी टाहो फोडला.आमच्या निष्पाप लेकराची काय चूक.त्याला का म्हणून मारले, असे म्हणत आई-वडिलांसह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.त्यामुळे भामरागड ग्रामीण रुग्णालय परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.

सदर घटना ९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तीन नक्षली वेशभूषेत आले.शेतात काम करीत असतांना बोलण्यासाठी म्हणून साईनाथ ला गणवेशातील तीन नक्षली दूर घेऊन गेले.बराच वेळ होऊनही तो परतलाच नाही.काही वेळाने एका शेतकऱ्याने मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली,त्यानंतर साईनाथ नरोटीच्या कुटुंबाने तिकडे धाव घेतली.मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नक्षल्यांनी गोळ्या झाडून संपविले असल्याचे उघडकीस आले.

साईनाथ चैतू नरोटी वय २६ वर्षे असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.साईनाथ पदवीच्या अंतिम वर्षात शिकत होता.चैतू नरोटी हे भामरागड तालुक्यातील मरदुर येथील रहिवासी असून गावातील सधन शेतकरी म्हणून त्यांचा समावेश आहे.त्यांचा मुलगा लहानपणापासूनच हुशार होता.त्याला आई- वडिलांनी जिद्दीने शिकवले.साईनाथ होळीला गावी आला होता. त्याला परत जायचे होते; पण आई-वडिलांसह शेतात गेला आणि नक्षल्यांचा शिकार झाला. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!