Monday, May 25, 2026
Homeबुलढाणाहृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या भालांजन गावाशेजारील राजुरा धरण परिसरात असलेल्या विहिरीत एकाच वेळी पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिक नागरिकांना विहिरीत पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळल्याने त्यांनी त्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली.त्यानंतर,जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची ओळख पटली.यात वडील,दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे.विजय मुसा किराडिया वय २७ वर्षे(वडील),प्रित किराडिया वय ८ वर्षे(मुलगा),प्राची किराडिया वय ६ वर्षे,पूर्वी किराडिया वय ४ वर्षे(मुली व पियुष किराडिया वय २ वर्षे(मुलगा)अशी मृतांची नावे असून सर्वजण जळगाव जामोद तालुक्याच्या राजुरा ग्रामपंचायत उमापुर(भालांजन)गावातील रहिवासी आहेत.
विजय किराडियाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते.भांडण झाल्याने पत्नी चारही मुलांना घरीच सोडून इस्लामपूर येथील आपल्या माहेरी निघून गेली होती.त्यामुळे विजय आज सकाळी स्वतः घरचे काम करत होता.यावेळी त्याच्या वडिलांनी तू काम का करत आहेस?तुझी बायको कुठे गेली? असा प्रश्न केला.त्यातून झालेल्या वादातून विजय किराडिया याने आपल्या चारही मुलांना राजुरा धरण परिसरात नेत  विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील तथा पोलीस पथक करीत आहेत.एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा पद्धतीने अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.तब्बल पाच जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!