Monday, August 31, 2026
Homeबुलढाणाहृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या भालांजन गावाशेजारील राजुरा धरण परिसरात असलेल्या विहिरीत एकाच वेळी पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिक नागरिकांना विहिरीत पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळल्याने त्यांनी त्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली.त्यानंतर,जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची ओळख पटली.यात वडील,दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे.विजय मुसा किराडिया वय २७ वर्षे(वडील),प्रित किराडिया वय ८ वर्षे(मुलगा),प्राची किराडिया वय ६ वर्षे,पूर्वी किराडिया वय ४ वर्षे(मुली व पियुष किराडिया वय २ वर्षे(मुलगा)अशी मृतांची नावे असून सर्वजण जळगाव जामोद तालुक्याच्या राजुरा ग्रामपंचायत उमापुर(भालांजन)गावातील रहिवासी आहेत.
विजय किराडियाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते.भांडण झाल्याने पत्नी चारही मुलांना घरीच सोडून इस्लामपूर येथील आपल्या माहेरी निघून गेली होती.त्यामुळे विजय आज सकाळी स्वतः घरचे काम करत होता.यावेळी त्याच्या वडिलांनी तू काम का करत आहेस?तुझी बायको कुठे गेली? असा प्रश्न केला.त्यातून झालेल्या वादातून विजय किराडिया याने आपल्या चारही मुलांना राजुरा धरण परिसरात नेत  विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील तथा पोलीस पथक करीत आहेत.एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा पद्धतीने अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.तब्बल पाच जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!