Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीहजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगभूमीवर साकारले गोंडवानाचा महायोध्दाचे क्रांतियुद्ध- प्रेक्षक झाले तल्लीन.....

हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगभूमीवर साकारले गोंडवानाचा महायोध्दाचे क्रांतियुद्ध- प्रेक्षक झाले तल्लीन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागड च्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या  “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गडचिरोली येथे निःशुल्क सादर करण्यात आला.  रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे सदर प्रयोगाला दाद दिली. 

झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी  नाटकाचे लेखन केले असून,प्रसिद्ध गायक,दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा,नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने लोकजागृती संस्था चंद्रपूरच्या वतीने नाटकाची निर्मिती करण्यात आली. 

जिथे बंदुकीच्या जोरावर दाबून टाकण्यात आला सन १८५७ चा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उठाव तिथे म्हणूनच जन्मास आला सन १८५८ चा आदिवासींचा सशस्त्र क्रांतीचा उठाव आणि या उठावाचे पहिले क्रांतिस्थळ होते गडचिरोली जिल्ह्यातील मोलमपल्ली जमीनदारी आणि पहिले आद्य क्रांतिकारक होते “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके”. या क्रांतिविराची गाथा प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करण्यात कलावंत यशस्वी ठरले.

नाटकाचे उद्घाटन डॉ.अनिल हिरेखन कुलसचिव यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.प्रमुख अतिथी म्हणून   देवराव होळी आमदार,नामदेव उसेंडी माजी आमदार,शिवप्रसाद गौड अतिथी प्राध्यापक,राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली,सचिन मडावी,सहा. आयुक्त सामाजिक न्याय विभाग,ॲड.राम मेश्राम माजी नगराध्यक्ष,माधव गावड अध्यक्ष,ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन,वसंत कुलसंगे,मारोतराव ईचोडकर माजी सभापती,शेखर डोंगरे झाडीपट्टी कलावंत व सामाजिक कार्यकर्ते मुनिश्वर बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

नाट्य प्रशिक्षण शाळेतील ३५ कलावंतांनी उत्कृष्ट नाट्य सादर केले असून सदरचे नाट्य गडचिरोली जिल्ह्याचे भूषण आहे.असे गौरवोद्गार डॉ.नामदेव उसेंडी यांनी नाट्य प्रसंगी काढले तर नाटकाचे प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यापाड्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे; असे मत डॉ. देवराव होळी यांनी काढले.सदर नाट्यची निर्मिती संगीता टिपले कार्यशाळा संचालक व अनिरुद्ध वनकर कार्यशाळा समन्वयक यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!