- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शेतीच्या सातबाऱ्यावर नाव असलेला घरचा एखादा व्यक्ती मृत पावल्यास वारसानचे म्हणजेच मुलगा,मुलगी,पत्नी वा इतरांचे नाव चढवायचे असेल,तर त्यासाठी एक रुपयाही लागत नाही.याविषयी अनेकांना याची माहिती नसल्याने तलाठी,मंडळ अधिकारी वा इतर चेलेचपाटे लवकर काम करून देतो,असे सांगून १ हजार,२ हजार वा इतर रकमेची मागणी करून गोर-गरिबांना लुटण्याचे काम करीत आहेत.वारसानचे नाव चढवायसाठी भरपूर पैसे लागतात,अशी शेतकऱ्यांची मनधारणा झाली असल्याने अनेकांनी कुटुंबातील वारसानची नावे सात बाऱ्यावर अनेक महिन्यांपासून वा वर्षांपासून चढविलेली नाहीत.कारण की,आम्हाला याची माहितीच नसल्याने असे होते आहे.याकरिता वारसान नोंदीची प्रक्रिया कागदपत्रे गोळा करणे व संबंधित साज्यातील तलाठ्यास नेऊन देणे असून त्याकरिता कुठलीही फी वा पैसे लागत नाही.वारसान फेरफार नोंदी करीता फेरफार अर्ज,पाच रुपयाची तिकीट,जी व्यक्ती मयत झाली अशाचा मृत्यू दाखला,अर्ज दाराची एक फोटो,चालू सात बारा,वारसान प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच व पोलीस पाटील यांचा,नावे चढविणाऱ्यांचे आधार कार्ड,१०० रुपयाचे स्टॅम्प पेपर इत्यादी कागदपत्रे गोळा करून गावातील तलाठ्यास सादर करावित.वारसान फेरफार नोंदी करीता कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.अशातच वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैश्याची मागणी करणे एका महिला तलाठीस महागात पडले आहे.गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक-१७ येथे कार्यरत अश्विनी ठोंबरे हिने खासगी इसम ओंकार शेंडे रा.कोहळीटोला याच्या मार्फतीने ८०० रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे.तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने सातबारा उतारावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती.यासाठी त्यांनी संपूर्ण कागदपत्रे गोळा करून तलाठीकडे सादर केलीत.मात्र,
वारस फेरफार नोंद घेण्यासाठी १ हजार रुपये लागतील,असे तक्रारदारास सांगण्यात आले व तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले.तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल गुरुवारी दुपारच्या सुमारास सापळा रचला व तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता, तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.त्यामुळे वारस फेरफार करण्यासाठी कुणीही पैसे मागत असेल तर त्याची तक्रार डायरेक्ट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करा.
- Advertisement -