उद्रेक न्युज वृत्त
सिरोंचा :- तालुक्यातील झिंगानूर चेक नंबर १ झिंगानूर चेक नं.२ येथील नागरिक ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण करीत असून गावजवळूनच वाहणाऱ्या नाल्यात खड्डा करून पाणी आणून नाल्यातील गढूळ पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात आहे.
गावात पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करून बांधकाम करण्यात आले.मात्र दोन वर्षे लोटूनही पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली नसल्याने वारंवार दरवर्षी गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विहीरींना व हातपंपना पाणी येत नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते.
शासन स्तरावरून करोडो रुपये खर्च करून नागरिकांसाठी पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात येतात;मात्र प्रत्यक्षात अतिदुर्गम भागत पोहचविल्याच जात नसल्याने वा पोहचविन्यात येतात तर त्यावर अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पाणी पुरवठा योजना बांधकाम करून दोन वर्षे झाली तरी सुद्धा समस्यांवर तोडगा काढण्यात आला नसल्याने यावर पाणी टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी गावातील व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

