Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग बनला 'झोलबा पाटलाचा वाडा'…..- अरे गबाड्या तुझे आहे;...

देसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग बनला ‘झोलबा पाटलाचा वाडा’…..- अरे गबाड्या तुझे आहे; तुझ पाशी…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये शासन स्तरावरून मंजूर केली जातात.मात्र जिल्ह्याचा विकास काही होईना…! कारण की,बाहेर ठिकाणाहून येणारे ‘सब माल डब्बे मे’ असे करून पोबारा करीत असतात.असाच प्रकार हल्ली सामाजिक वनीकरण विभागामध्ये सुरू असल्याने देसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग बनला ‘झोलबा पाटलाचा वाडा’…..असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड म्हणजेच झाडे लावली जातात.जसे,मुख्य डांबरीकरण रस्त्याच्या कडेला,गावातील पांदन रस्ते,एखाद्या तलाव पाळीवर,शेतकऱ्यांच्या शेत बांधावर व इतर ठिकाणी वृक्ष लागवड म्हणजेच झाडे लावून; अशी झाडे जिवंत ठेवण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची असते.त्यांचे मुख्य काम केवळ ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे आहे.त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागास कोट्यवधी रुपये शासन स्तरावरून दिली जातात.मात्र शासन स्तरावरून दिला जाणारा निधी खरोखरच दिलेल्या कामांसाठी लावण्यात येतो काय?

देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना व इतर योजने अंतर्गत तसेच हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत असूनही न दिसल्या सारखे करणे म्हणजे ‘सांबर गेला एकीकडे व वडा राहिला दुसरीकडे’ असे एसीच्या रूममध्ये बसणाऱ्या हॉटेल अधिकाऱ्याचे झाले आहे.

देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीच्या काही साईटचे अवलोकन व प्रत्यक्ष साईटवर रामटेके यांनी भेट दिले असता रोपवन साईटवर बोर्ड लावणे आवश्यक असता; त्याठिकाणी बोर्डच नाही,काही अंतरावर वृक्षेच नाही,जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना जास्त दाखविणे,मोजमाप पुस्तिका प्रमाणित नाही,त्यावर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही,मोजमाप पुस्तिका अपूर्ण लिहिण्यात आल्या,अंदाज पत्रकानुसर तरतूद नाही,शेणखत,रोपे वाहतुकीच्या निविदा मागविण्यात आल्या नाही,मजुर पुरवठा स्वतः करण्यात आला,आपल्याच घरची संस्था निवड केली व इतर असे अनेक गैरव्यवहार व भ्रष्टाचार करून करोडो रुपये गब्बन करून ‘गब्बर सिंगची’ भूमिका बजावण्यात आली आहे.तरीही ‘तो’ म्हणतो अहवाल येऊ द्या..! ‘अरे सर्वच तुझे आहे; तुझ पाशी तरीही तुला कळेना..! कां बनतोस येळा गबाड्या… त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे गणित अजूनही कुणालाच कळलेले नसल्याने सध्या ‘नरम व नंतर गरम’ असा माहोल दिसून येणार आहे.त्यामुळे ‘लोक सेवकांनो सावधान पुढील घंटा’ ही धोक्याचीच समजावी लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!