Saturday, April 18, 2026
Homeजळगांवतीन दिवसांपूर्वीच लग्न आणि आज सीमेवर जाण्यासाठी रवाना.. - देशसेवेपेक्षा मोठे काहीही...

तीन दिवसांपूर्वीच लग्न आणि आज सीमेवर जाण्यासाठी रवाना.. – देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही; नवविवाहिताचे उदगार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजण्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच्या मध्यरात्री भारताने मिशन ‘सिंदुर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले.त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी झाली आहे. युद्धजण्य परिस्थिती उद्भवल्याने आयुध निर्माणी कारखान्यात दारूगोटा साठा वाढविण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यानुसार आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील नंदीचे खेडगाव येथील सैनिक मनोज पाटील यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे, मनोज पाटील यांचा नुकताच सोमवार ५ मे रोजी विवाह सोहळा पार पडला.देशात युद्धजण्य परिस्थिती असल्याने मनोज यांना त्वरेने बोलावण्यात आले आहे. यासाठी आज,गुरुवार ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी रवाना झाले आहेत. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी परतला होता. पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही,तोच सरकारने मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे.कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतांनाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोजला गर्व आहे.देशसेवेपेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोजने व्यक्त केली.तर त्यांची पत्नी यामिनी हिनेदेखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!