Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीतरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गडचिरोलीतील तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील तरुणांना विविध कौशल्यांमध्ये सक्षम बनवून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.या प्रशिक्षणामध्ये तरुणांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रांमधील कोर्सेसचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कृषी,बांधकाम,आयटी,पर्यटन व आदरातिथ्य, खाणकाम, वाहन उद्योग,ग्रीन जॉब्स,व्यवस्थापन आणि उद्योजकता, आरोग्य सेवा,वस्त्रोद्योग,मीडिया आणि मनोरंजन,फर्निचर अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.ज्या शासकीय संस्थांची नोंदणी आधीपासूनच एमएसएसडीएस पोर्टलवर आहे,त्यांना पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र,ज्या शासकीय संस्थांची नोंदणी नाही,त्यांनी ग्रीनचॅनलद्वारे या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.त्याचप्रमाणे,इतर खाजगी आस्थापना, औद्योगिक आस्थापना आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी असणे आणि संबंधित कोर्सेससाठी मान्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.या सर्व इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत.या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,बॅरेक क्र.२,शासकीय संकुल, गडचिरोली येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!