- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सामाजिक तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या पुरस्कारांमध्ये सर्वात मोठा सन्मान सामाजिक कार्यकर्ते आणि सर्च फाऊंडेशनचे संचालक पद्मश्री डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांना विशेष जीवन गौरव पुरस्काराने येत्या ३ फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
येत्या ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात राजबाग,लोणी-काळभोर,पुणे येथे होणाऱ्या समारंभात पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर,पद्मभूषण डॉ.विजय भटकर आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात सव्वा लाख रुपये रोख,सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असा समावेश असणार आहे.
- Advertisement -

