Wednesday, March 11, 2026
Homeगडचिरोलीघरकुल बांधकामास आधार देणारेच झाले निराधार....!'नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी'….कंत्राटी...

घरकुल बांधकामास आधार देणारेच झाले निराधार….!’नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी’….कंत्राटी अभियंत्यांचे ८ महिन्यांपासून रखडले मानधन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- ग्रामीण भागातील गोर गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुल बांधकामाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांचे गेली ८ महिन्यांपासून मानधन रखडले असल्याने घरकुल बांधकामास आधार देणारेच निराधार झाले आहेत.अशातच ‘करीत रहा काम; तुम्हाला मिळणार नाही दाम’ असे हल्ली ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या बाबतीत दिसून येत असल्याने घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या अभियंत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंते(इंजिनिअर) घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा समजला जातो आहे.घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होण्यापासून तर बांधकाम पूर्ण होण्यास्तवची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.जसे,कितीतरी किलोमीटर अंतरावरील घरकुल लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देणे,बांधकामाची आखणी करून देणे, टप्पे निहाय घरकुल बांधकामाचे फोटो काढून नेणे, लाभार्थ्यांना हफ्ते वितरीत करणे,वेळोवेळी बांधकामा संबंधी तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे व इतर अशी अनेक कामे अभियंते करीत असतात.मात्र गेली ८ महिन्यांपासून ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांचे मानधन मिळाले नसल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या घरा पर्यंत जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच वेळेवर मानधन मिळत नसल्याने अभियंत्यांवर उपासमारीची पाळी बरोबरच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.’नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी’अशी अवस्था हल्ली ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांची झाली आहे.

मिळणारे मानधन अत्यल्प असूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कुटुंब सांभाळावे कसे?कामे करायची कशी?असा विचार अभियंत्यांच्या मनात घर करून सोडत आहे.कित्येकदा संप पुकारून आंदोलने करण्यात आली.मात्र शासनास केव्हा जाग येणार? हे अनेकांना कळेनासे झाले आहे.एकीकडे कामे करवून घेणे व कंत्राटी कर्मचारी वर्गांचे शोषण करणे असे दिसून येत आहे.नियमित कर्मचारी वर्गांचे वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांना कसे वाटणार? यासाठी शासनाने मानधनात वाढ करून गेली ८ महिन्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे; तसेच वेळेवर मानधन देण्यात यावे; अशी मागणी ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून 'दंड आत्ताच भरा,अन्यथा...

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील...

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality...

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!