- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यासह भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, नागपूर व राज्यातील विविध जिल्ह्यात कोसळधारा पडलेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळित केले.अश्यातच आता हवामान खात्याने उद्या,गुरुवार २१ ऑगस्ट पासून राज्यात पाऊस शांत बसणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.मात्र,दोन दिवसांपासून धूम ठोकणाऱ्या पावसामुळे विविध नद्यांच्या तसेच धरणांच्या पाणी पातळीत कमी अधिक वाढ झाली आहे.त्यातच भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणाऱ्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने आज,बुधवार २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजे ३३ पैकी १५ दार उघडण्यात आले असून १ हजार ८०१ पाण्याचा विसर्ग,तर ६३,६११ क्युमेक्स पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
वैनगंगा नदीची आष्टी स्टेशनवर,पाण्याची पातळी इशारा पातळीच्या वर स्थिर आहे.मात्र,देसाईगंज (वडसा)आणि चिचडोह बॅरेज येथे वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
- धरण विसर्ग सध्याची स्थिती👇
चिचडोह बॅरेज- गेट सुरु-३८ पैकी ३८ गेट उघडलेले
विसर्ग- १०,५९३ क्युमेक्स (३,७४,०९२ क्युसेक्स)
निम्न वर्धा प्रकल्प- गेट सुरु-३१ पैकी १९ गेट उघडलेले,विसर्ग-५०५ क्युमेक्स (१७,८५६ क्युसेक्स)
श्रीराम सागर प्रकल्प- गेट सुरु-४२ पैकी १६ गेट उघडलेले,विसर्ग-१४९७ क्युमेक्स (५२,८५० क्युसेक्स)
श्रीपदा येलमपल्ली प्रकल्प- गेट सुरु-६२ पैकी ४० गेट उघडलेले,विसर्ग-१५१५७ क्युमेक्स (५,३५,२८२ क्युसेक्स)
मेडीगड्डा बॅरेज- गेट सुरु-८५ पैकी ८५ गेट उघडले,
विसर्ग- २८,५३० क्युमेक्स (१०,०७,५३० क्युसेक्स)
- प्रमुख नद्यांची सध्याची पाणी पातळी👇
वर्धा नदी- सिरपूर टाऊन स्टेशनवर,वर्धा नदी इशारा पातळीच्या वर स्थिर वाहत आहे.
प्राणहिता नदी-अहेरी गुडम स्टेशनवर,प्राणहिता नदी इशारा पातळीच्या वर वाढत आहे.
गोदावरी नदी- कालेश्वरम स्टेशनवर,गोदावरी नदी इशारा पातळीच्या वर वाढत आहे.
इंद्रावती नदी- चिंदनार,जगदलपूर आणि पाथागुडम स्टेशनवर,नदीची पाणी पातळीइशारा पातळीच्या खाली कमी होत आहे.
- Advertisement -

