Monday, December 15, 2025
Homeबुलढाणागुरुजींनीच फोडला बारावीचा पेपर; प्रत्येकी १२ हजाराची डील- ९९ जणांचा केला गृप...

गुरुजींनीच फोडला बारावीचा पेपर; प्रत्येकी १२ हजाराची डील- ९९ जणांचा केला गृप तयार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बुलढाणा :- सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्याकडे शिक्षण विभागाने भर दिला आहे.मात्र बुलढाण्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. सातत्याने बारावीच्या पेपरात गंभीर चुका होत असल्याचे समोर येत असताना बुलढाण्यात गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पेपर फुटी प्रकरणामध्ये दोन शिक्षकांना अटक केली आहे.शिक्षकांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवून पेपर व्हायरल केला असल्याचे समोर आले आहे.ग्रुपमध्ये एकूण ९९ जणांचा समावेश होता.पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.परीक्षेत गैर प्रकार करण्यासाठी कट रचला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी बारावीच्या गणिताचा पेपर सुरू होणार होता; मात्र त्याआधीच सिंदखेड राजा तालुक्यात साडेदहा वाजता सोशल मीडियावर गणिताचा पेपर येऊन धडकला.गणिताचा पेपर फुटला असल्याची बोंब पेपर सुरू होण्या आधीच उठली. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते.बारावीच्या परीक्षेत शिक्षण विभागाच्या सातत्याने चुका समोर येत आहेत.त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग उच्च माध्यमिक शिक्षण विभाग बारावीच्या परीक्षा घेताना किती जबाबदारीने वागतात ते सिद्ध होत आहे.बुलढाण्यात पेपर सुरू होण्याआधीच पेपर फुटला.अशा सातत्याने होणाऱ्या चुकांना नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न पडला  आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!