Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने घातला थैमान...!- संततधार पाऊस,वादळ-वाऱ्याने जनजीवन  विस्कळित....- 'घरी लग्न...

गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने घातला थैमान…!- संततधार पाऊस,वादळ-वाऱ्याने जनजीवन  विस्कळित….- ‘घरी लग्न तर अवकाळी पावसाने घातलाय विघ्न’….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यात दररोज अवकाळी पावसाने थैमान घालत संततधार पडणारा पाऊस, वादळ-वारा,मेघ गर्जना व विजांचे कडकडाटाने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.आज ३० एप्रिल २०२३ रोजी रात्रौ पासूनच अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने अनेक नागरिकांची घरे व झोपड्या वरील छत उडाले असल्याने नागरिकांनी नुकसाभरपाईची मागणी केली आहे.अशातच सर्वसामान्य नागरिक सध्या सुरू असलेला उन्हाळा की पावसाळा अशा संभ्रमात पडले आहेत.

हल्ली काही शेतकरी बांधवांचे धान पीक निसावण्याच्या तयारीत असतांना अवकाळी पडणारे पावसाचे पाणी त्यासाठी घातक ठरू लागले आहे. सोसाट्याच्या वादळ-वाऱ्याने उभे असलेले धान पीक खाली झोपू लागले आहेत.अशातच धो-धो पडणारा पाऊस व वादळ वारा आणखी किती दिवस येणार?असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या स्थितीत लग्न समारंभ सुरू असून ‘घरी लग्न तर अवकाळी पावसाने घातलाय विघ्न’अशी हल्ली परिस्थिती उद्भवली असल्याने विवाह सोहळ्यात अवकाळी पावसामुळे विरजण पडले आहे.धो-धो पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावरून पाणी तसेच नाल्या भरभरून वाहू लागल्या आहेत. लग्न समारंभातील वऱ्हाडी मंडळी पावसामुळे एखाद्या घराचा वा सार्वजनिक ठिकाणचा आडोसा घेतांना दिसून येत आहेत.सकाळचे विवाह दुपारी वा सायंकाळी लागतांना दिसून येत आहेत.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत अवकाळी पाऊस,वादळ वारा व कडकडाटासह मेघ गर्जना होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.त्यानुसार अवकाळी पावसाने थैमान घालत जनजीवन विस्कळित केले आहे.अशातच आणखी किती दिवस अवकाळी पाऊस पडणार आहे; अशी स्थिती हल्ली निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!