उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- संपूर्ण देशात कोरोना संसर्गजन्य आजाराने हाहाकार माजवला होता.कोरोणामुळे अनेकांनी जीव गमावले होते.अशातच कोरोना काळात नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कामे करून शासनाची मदत केली.काही वर्षानंतर कोरोना संसर्गजन्य आजारावर नियंत्रण करण्यात शासनास यश आले.परंतु नंतरच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे कंत्राटी कर्मचारी कामे नसल्याने बेरोजगार झाले.नंतरच्या काळात शिंदे फडवणीस सरकारने कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ नियुक्ती करू; अशी घोषणा केली.
परंतु आज पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही.याबाबत गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक रुडे यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारणा केली असता; आम्हाला कोणताही आदेश आले नसल्याचे सांगितले.यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुर्णपणे फोल व खोटी घोषणा केल्याचे सिद्ध झाले असल्याचे शिवसेना शिष्ट मंडळास लक्षात आले. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्त करावे; अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येईल; असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला आहे.