- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीककर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये,असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत.
सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे.या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पात्र अल्पमुदतीच्या पीककर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे.तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता(ओटीएस)योजनेचा लाभ,तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद आहे.
सध्या पात्र कर्जखात्यांची माहिती अपलोड करणे, पडताळणी,आधार प्रमाणीकरण व कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून,ती पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.या कालावधीत शेतकऱ्यांच्या पात्र थकीत पीककर्जावर १ एप्रिल २०२६ पासून कर्जमाफीचा लाभ खात्यात जमा होईपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही,असे शासनाने स्पष्ट केले आहे.हा आदेश सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना लागू राहणार आहे.
- Advertisement -

