Monday, December 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तउरल्या-सुरल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी..

उरल्या-सुरल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांतच शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे.अद्याप सर्वच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी केली असावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरीही एखादा सुटलेला शेतकरी वा उरल्या-सुरल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी केलेली नसेल,अशांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी; अन्यथा ज्यांची ‘ई पीक पाहणी’ नोंदणी झालेली नाही; अशांना हमीभाव आणि बोनसला मुकावे लागणार आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट बोनसचा लाभ दिला जातो आहे.त्यामुळे नोंदणी आवश्यक आहे.पूर,अतिवृष्टी आणि इतर समस्येचा विचार करता,शासनाने पुनश्च एकदा ई-पीक पाहणी नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणीची नोंद करणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!