Saturday, March 15, 2025
Homeराजस्थानआश्चर्यचकित...! एका मिठा पानची किंमत ३२०० रुपये- खास नवविवाहित नवरदेव, नवरी साठी...
spot_img

आश्चर्यचकित…! एका मिठा पानची किंमत ३२०० रुपये- खास नवविवाहित नवरदेव, नवरी साठी तयार केले जाते पान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

राजस्थान :- खाण्याचे पान किंवा विडा ज्याला आपण मसाला पान किंवा मिठा पान म्हणून ओळखतो.त्याची किंमत किती असू शकेल? याचा विचार आपण फारसा करतच नाही.कारण ती पंधरा-वीस रुपयांच्यावर किंवा फारतर पन्नास रुपये असू शकेल,असे आपल्याला वाटते.तथापि, राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात एक पानाचे दुकान असे आहे की जेथे ३२०० रुपयांचे पान मिळते.अर्थात हे पान नेहमी तयार केले जात नाही किंवा ते ऑफ द काऊंटर मिळत नाही.यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागते.त्यानंतरच ते करायला घेतले जाते. अलवार शहरात एका पान भांडारात ते मिळते.संपूर्ण भारतात इतके महाग पान कोठेच मिळत नाही,असे बोलले जाते.नवविवाहित नवरा अन् नवरी यांनी एकत्र खाण्याचे हे पान आहे.केवळ त्यांच्यासाठीच ते बनविले जाते,असे या दुकानाचे मालक म्हणतात.

लग्नसराईत या पानाला प्रचंड मागणी असते. दूरदूरच्या शहरांमधून या पानासाठी ऑर्डरी येतात. ते ताज्या अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेद्वारे पाठविले जाते. या पानात कोणते पदार्थ घातले जातात, हे टॉप सिक्रेट आहे. पानाच्या चवीवरून त्याचे काही प्रमाणात अनुमान काढता येते.तथापि,अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना असे पान बनविता आलेले नाही,ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे हे पान म्हणजे या दुकानाची अनोखी विशेषतः आहे,असे मानले जाते.हे पान केवळ चवीसाठी नव्हे तर त्यातल्या पौष्टिक घटकांसाठीही प्रसिद्ध आहे.या पानामुळे जड अन्नपदार्थांचे पचनही उत्तमरीतीने होते आणि ॲसिडिटी किंवा गॅसेस यांचा त्रास होत नाही.पानात आयुर्वेदिक पदार्थ घातलेले असतात,असे बोलले जाते.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!