Monday, July 27, 2026
Homeराजस्थानआश्चर्यचकित...! एका मिठा पानची किंमत ३२०० रुपये- खास नवविवाहित नवरदेव, नवरी साठी...

आश्चर्यचकित…! एका मिठा पानची किंमत ३२०० रुपये- खास नवविवाहित नवरदेव, नवरी साठी तयार केले जाते पान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

राजस्थान :- खाण्याचे पान किंवा विडा ज्याला आपण मसाला पान किंवा मिठा पान म्हणून ओळखतो.त्याची किंमत किती असू शकेल? याचा विचार आपण फारसा करतच नाही.कारण ती पंधरा-वीस रुपयांच्यावर किंवा फारतर पन्नास रुपये असू शकेल,असे आपल्याला वाटते.तथापि, राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात एक पानाचे दुकान असे आहे की जेथे ३२०० रुपयांचे पान मिळते.अर्थात हे पान नेहमी तयार केले जात नाही किंवा ते ऑफ द काऊंटर मिळत नाही.यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागते.त्यानंतरच ते करायला घेतले जाते. अलवार शहरात एका पान भांडारात ते मिळते.संपूर्ण भारतात इतके महाग पान कोठेच मिळत नाही,असे बोलले जाते.नवविवाहित नवरा अन् नवरी यांनी एकत्र खाण्याचे हे पान आहे.केवळ त्यांच्यासाठीच ते बनविले जाते,असे या दुकानाचे मालक म्हणतात.

लग्नसराईत या पानाला प्रचंड मागणी असते. दूरदूरच्या शहरांमधून या पानासाठी ऑर्डरी येतात. ते ताज्या अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेद्वारे पाठविले जाते. या पानात कोणते पदार्थ घातले जातात, हे टॉप सिक्रेट आहे. पानाच्या चवीवरून त्याचे काही प्रमाणात अनुमान काढता येते.तथापि,अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना असे पान बनविता आलेले नाही,ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे हे पान म्हणजे या दुकानाची अनोखी विशेषतः आहे,असे मानले जाते.हे पान केवळ चवीसाठी नव्हे तर त्यातल्या पौष्टिक घटकांसाठीही प्रसिद्ध आहे.या पानामुळे जड अन्नपदार्थांचे पचनही उत्तमरीतीने होते आणि ॲसिडिटी किंवा गॅसेस यांचा त्रास होत नाही.पानात आयुर्वेदिक पदार्थ घातलेले असतात,असे बोलले जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!