Friday, April 10, 2026
Homeगडचिरोलीआपण जी फळे खातो ती आरोग्यास लाभदायक की हानिकारक....!- फळांच्या देठामध्ये टाकले...

आपण जी फळे खातो ती आरोग्यास लाभदायक की हानिकारक….!- फळांच्या देठामध्ये टाकले जाते रसायनयुक्त इंजेक्शन- नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- बाजारपेठांमध्ये हल्ली उष्णतेपासून बचाव करण्याकरिता टवटवीत व आकाराने मोठी दिसणारी फळे खरोखरच आरोग्यास लाभदायक की हानिकारक असा प्रश्न पडला आहे.टवटवीत,आकाराने मोठी व रंग गडद असणाऱ्या फळांच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उन्हाळ्यात मानवी शरीरासाठी टरबूज व खरबूज पोषक असतात.टरबूज व खरबूज लहानांपासून तर वृद्धापर्यंत मोठ्या आवडीने खातात.उन्हाळ्याच्या दिवसात ही फळे उष्णतेपासून बचाव करण्याकरिता फार मदत करतात.फळे आरोग्यास हितकारक असली तरी फळांचा आकार वाढविण्यासाठी तसेच रंग गडत दिसण्याकरिता ‘ऑक्टोसीन’ नावाच्या घातक रसायनाचे इंजेक्शन फळांना दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आरोग्यवर्धक म्हणून प्रत्येक फळांना महत्त्व आहे. यामध्ये टरबूज,खरबूज, काकडी,सफरचंद,पपई, फणस,आंबा,डाळींब,केळी सारख्या आरोग्यवर्धक फळांना जास्तीत जास्त मोठा आकार येण्यासाठी काही खासगी सिड कंपन्या शेतकऱ्यांना बीजे पुरवून या फळांच्या देठामध्ये घातक रसायन असलेले 3 ते 4 मिली सोडण्यासाठी सांगतात.फळांच्या देठामध्ये रसायन टाकल्याने फळांचा आकार लवकरात लवकर मोठा होऊन अशांची विक्री बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

फळांचा रंग गडद व आकार मोठा दिसत असल्याने भुरळ घातली जात आहे.मात्र अशी ही फळे खरोखरच पोषक व आरोग्यवर्धक असतात कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.फळांच्या देठामध्ये प्रामुख्याने ‘ऑक्टोसीन’ नावाचे घटक असलेल्या इंजेक्शनचा वापर करण्यात येतो.शासनाने अशा प्रकारच्या रसायनावर बंदी घातलेली असल्याने असे इंजेक्शन आंध्रप्रदेश,कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात येत असून परिसरात त्याची विक्री सर्रास होताना दिसत आहे.इंजेक्शनचा उपयोग प्रामुख्याने वामरू मरण पावलेल्या दुधाळ जनावरांचे दूध काढतेवेळी करण्यात येतो.रसायनाचा वापर त्वरित बंद करून यावर आळा घातला पाहिजे.अन्यथा पैश्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणे सुरूच राहणार  आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

खोटी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी दोन यू-ट्यूब चॅनल्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसरभवनचौक परिसरात डॉ.उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये मंगळवार,७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास संशयास्पद स्फोटके...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!