Thursday, May 22, 2025
Homeनाशिकअन् ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीचा घेतला ठराव
spot_img

अन् ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीचा घेतला ठराव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नाशिक :- पाहिजे त्या प्रमाणात शेत मालाला भाव मिळत नाही.कितीही राबून कर्जाचे डोंगर उभे येऊन ठाकले आहे.कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी अवकाळी पाऊस,गारपीट व इतर समस्यांना शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागत आहे.अशातच शेत मालाच्या पिकांचे उत्पादन चांगले झाल्यास योग्य भाव मिळत नसल्याने काल सोमवारी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.माळवाडी गावातील ९५ टक्के शेतकरी हे कांदा उत्पादक आहेत.याशिवाय नगदी पिक म्हणून काही जण भाजीपालाही लावतात.मात्र,गावकरी घेत असलेल्या कोणत्याही पिकाला गेल्या ३ ते ४ वर्षांत योग्य भाव मिळाला नाही,असा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला.गावातील सर्व कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती आहे. मात्र,शेतीमालाला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहासाठीही पैसे राहत नाही.आरोग्य,शिक्षण,लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाच शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून मिळत नाही.त्यामुळे हे गावच विकावे व त्यातून पैसे मिळावेत; असा ठराव ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या सभेत राज्य सरकारकडे काही मागण्याही करण्यात आल्या.पुर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या किमान गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करता येईल,इतपत त्याच्या मालाला भाव मिळावा; अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी. शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे,ते सरकारनेच विकत घ्यावे; अशी मागणी देवळा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालसुधारगृहातून अल्पवयीन मुलीचे पलायन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-आजची तरुणाई चित्रपटांतील कथानकांच्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रत्यक्ष कृती करू पाहतात. मात्र,चित्रपट व प्रत्यक्ष जीवनात जमीन अस्मानाचा फरक आहे.चित्रपटातील कथानक चांगल्या...

अन् क्षणात कुटूंबात पसरली स्मशान शांतता .. – सासरी गेलेल्या चुलत बहिणीने ओल्याच मेहंदीने परत येऊन बहिणीच्या तिरडीला दिला खांदा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-मन्न सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात काल,बुधवारी २१ मे रोजी घडली. चुलत बहिणीचा लग्न सोहळा आटोपून तिरोडा येथे कर्तव्यावर...

बोगस बियाणे व खते विक्री करतांना आढळल्यास परवाना होणार रद्द; १३ भरारी पथके स्थापन.. – युरिया खत जादा दराने विक्री केल्यास व युरिया सोबत...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बियाणे,खते व किटकनाशके यांच्या खरेदी विक्री,गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर 'निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण...

आयएएस अधिकारी सेवेतून बडतर्फ पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-आयएएस अधिकारी सेवेतून बडतर्फ पूजा खेडकरला अखेर आज,बुधवार २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.पूजा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!