Friday, November 7, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा... - आता नवे मुख्यमंत्री कोण?

अखेर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा… – आता नवे मुख्यमंत्री कोण?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपला असून २६ नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आज,मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.मात्र,नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार आहेत.काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवे सरकार स्थापन होईपर्यंत कारभार सांभाळणार आहेत.नवे
मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतांना विधानसभेचा पंच वार्षिक कार्यकाळ संपलेला आहे.विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो.मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते.तिन्ही
नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली व त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला.शिंदेंनी राजीनामा दिल्याने आता पुढील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये १३२ जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळवला आहे.अजित पवारांच्या पक्षाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे.महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असे एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी
वेळोवेळी सांगितले आहे.दरम्यान आज मुख्यमंत्री
पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे निश्चित
होणार असून उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री पदी
कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचे चित्र दिसत आहे.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच कायम रहावेत असे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.यामध्ये दीपक केसरकर, संजय शिरसाट यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असे भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे भाजपा नेत्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री कोण? याबद्दलची उत्सुकता कायम आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!