- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यापावेतो आपले आधार प्रमाणीकरण केले आहे; अशा १४ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४७ कोटी ३० लाख रुपये रक्कम शासनाने जमा केलेले असुन,यामध्ये गत ऑक्टोंबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ लाख रूपये जमा करण्यात आले आहे.या प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील ११२ शेतकऱ्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण केले नाही; अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सुविधा केंद्र अथवा आपल्या बँक शाखेत आपले आधार प्रमाणिकीकरण करुन घ्यावे.या योजनेमध्ये सन २०१७-१८,२०१८-१९,२०१९-२० या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे; अशा एकूण १४ हजार ८४१ हजार शेतकऱ्यांना आज पर्यंत एकूण ४७.३० कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे.असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी कळविले आहे.
- Advertisement -

