Tuesday, July 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबाकीच्यांना तीन हजार दिले आणि आम्हाला कां नाही? - पात्र लाडक्या बहिणींना...

बाकीच्यांना तीन हजार दिले आणि आम्हाला कां नाही? – पात्र लाडक्या बहिणींना चिंता; तुम्हालाही मिळणार तीन हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे रखडलेला असतांनाच नुकताच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १२ मे व १४ मे २०२६ रोजी जमा करण्यात आला होता.मात्र,सदरचा हप्ता हा सर्वच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली होती.अश्यातच आता ज्या उर्वरित महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले नव्हते अश्यांना काल,शुक्रवार २२ मे पासून बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.याबाबत अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश धडकल्याने चिंता करण्याची गरज नाही.
एकाच गावात राहतो,एकाच योजनेचे फॉर्म भरले, केवायसी पण पूर्ण आहे.मग इतर महिला लाभार्थ्यांचे दोन हप्ते दिले,मग आमचेच का रखडले?असा संतप्त सवाल काही लाडक्या बहिणींनी प्रशासनाला विचारला आहे.फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रवर्गातील महिलांना हप्ते वेळेवर मिळाले.मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये इतर प्रवर्गातील बहुतेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.मात्र,काही पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा झालेच नाही.बाकीच्यांना दिले आणि आम्हाला वगळले त्यामुळे आमची मोठी कुचंबणा होत आहे.एका गावात,एकाच योजनेत भेदभाव का? प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचण दूर करून थकीत दोन्ही हप्ते खात्यात जमा करावेत,अशी मागणी पात्र लाभार्थी महिलांनी केली आहे.विशेष म्हणजे,योजनेत पात्र असूनही काही महिलांना लाभ न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे, शासनाने यावेळेस मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन हप्ते देतेवेळी प्रवर्गवारीनुसार पाठवले.जसे की,सुरुवातीला ओबीसी,एसटी व नंतर एससी महिलांना लाभ देण्यात आला आणि बाकीच्यांना तीन हजार दिले आणि आम्हाला कां नाही?अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,तर संपूर्ण पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!